महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 4, 2020, 1:43 PM IST

ETV Bharat / bharat

'राम मंदिर हे राष्ट्रिय एकात्मतेचे प्रतिक ठरेल'

अयोध्येत होणारे राम मंदिर हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून ओळखले जाईल, असे मत प्रियांका गांधी यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले आहे.

priyanka gandhi
priyanka gandhi

नवी दिल्ली - बुधवारी (दि. 5 ऑगस्ट) आयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा होणार आहे. हे मंदिर भविष्यात राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून ओळखे जाईल, असे मत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा यांनी व्यक्त केले आहे.

श्री रामाबद्दल रामायणातून भारतासह संपूर्ण जगात माहित आहे. त्यांनी दिलेले त्याग, त्यांच्या मर्यादा हे सर्वांना ज्ञात आहेत. त्यामुळे त्यांना मर्यादा पुरषोत्तम, असेही संबोधले जाते, असे त्या म्हणाल्या

उद्या राम मंदिर भूमिपूजन आहे. हे मंदिर भविष्यात राष्ट्रीय एकात्मता, बंधूता व समतेचे प्रतिक म्हणून ओळखले जाईल, असे मत प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details