नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोहतांग पासला लेह-लडाखशी जोडणारा 'अटल बोगद्या'चे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. अटल बिहारी वाजपेयी यांनी 2002मध्ये या बोगद्याची पायाभरणी केली होती. मात्र, त्यांचे सरकार गेल्यानंतर बोगद्याचे काम संथगतीने सुरू होते. त्याच गतीने काम सुरू राहिले असते तर, बोगद्याचे काम 2040पर्यंत पूर्ण झाले असते, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.
देशाचे हित आणि सुरक्षेपेक्षा दुसरे काहीच म्हत्त्वपूर्ण नाही. आज अटल वाजपेयी यांचे स्वप्न पूर्ण झाले असून हिमाचलवासियांची प्रतीक्षा संपली. तसेच, सुधारणांची जिथे गरज असेल, तिथे सुधारणा करण्यात येतील. पिढ्या बदलत असून बदलत्या काळानुसार विचारही बदलावे लागतील, असे मोदी म्हणाले.