महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी पंतप्रधान मोदींची देशातील अर्थतज्ज्ञांबरोबर चर्चा - piyush goyal

नीती आयोगातर्फे आयोजित ‘इकोनॉमिक पॉलिसी- द रोड अहेड’ या चर्चासत्रात ४० हून अधिक अर्थशास्त्रज्ञ आणि अन्य जाणकारांनी भाग घेतला. यात बृहत् अर्थव्यवस्था आणि रोजगार, शेती आणि जलस्रोत, निर्यात, शिक्षण आणि आरोग्य आदींविषयी चर्चा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : Jun 22, 2019, 10:21 PM IST

नवी दिल्ली - पुढील महिन्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अर्थतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांसह चर्चा केली. सध्याच्या आर्थिक स्थितीबद्दल त्यांच्याशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. ५ जुलैला नव्या सरकारकडून या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प मांडतील.

नीती आयोगाने ‘इकोनॉमिक पॉलिसी- द रोड अहेड’ या चर्चासत्राचे आयोजन केले होते. यात ४० हून अधिक अर्थशास्त्रज्ञ आणि अन्य जाणकारांनी भाग घेतला. या वेळी ५ वेगवेगळ्या आर्थिक समूहांविषयी विचार व्यक्त करण्यात आले. यात बृहत् अर्थव्यवस्था आणि रोजगार, शेती आणि जलस्रोत, निर्यात, शिक्षण आणि आरोग्य आदींविषयी चर्चा झाली. पंतप्रधान कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.

अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूबद्दल अर्थतज्ञांनी जे सल्ले दिले. निरीक्षणे नोंदवली त्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी राव इंद्रजित सिंह, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details