चंदीगड- 'जेव्हा आम्ही स्वच्छ भारत मिशन आणि सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलतो तेव्हा विरोधकांच्या पोटात दुखतं आणि जर एखाद्यानं बालाकोटचं नाव काढलं की विरोधक वेदनेनं थयथयाट करतात', अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर हरियातील सोनिपत येथे विधानसभा प्रचार सभेदरम्यान केली.
हेही वाचा -न्यायमूर्ती बोबडे होणार उत्तराधिकारी, सरन्यायाधीश गोगोईंकडून शिफारस
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर मुद्दा मांडण्यासाठी विरोधकांच्या वक्तव्यांचा वापर करत आहे. हा काय प्रकार आहे? काँग्रेसच्या राज्यामध्ये जवान, शेतकरी आणि खेळाडू कोणीच सुरक्षित नाही. शेती आणि क्रीडा क्षेत्रामध्ये घोटाळे केल्याचा आरोप मोदींनी काँग्रेसवर केला.