चेन्नई : श्रीलंकेच्या नौदलाच्या ताब्यात असणाऱ्या ३६ भारतीयांची सुटका करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी प्रयत्न करावे, अशी मागणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मोदींना पत्र लिहीत, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला याबाबत तातडीने निर्देश देण्याची विनंती केली आहे.
"14 डिसेंबर 2020ला झालेल्या दोन घटनांकडे मी तुमचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो. पाच यांत्रिक मासेमार बोटींमध्ये असणाऱ्या ३६ भारतीय नागरिकांना श्रीलंकेच्या नौदलाने ताब्यात घेतले आहे. तामिळनाडूच्या रामनाथपूरम आणि थूतुकुडी या दोन ठिकाणचे हे नागरिक आहेत. त्यानंतर आतापर्यंत श्रीलंकेने या लोकांना सोडले नाही. त्यामुळे याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आपण परराष्ट्र मंत्रालयाला द्यावेत" असे या पत्रात लिहिले आहे.