महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

#CAA आंदोलन आसाम : काही भागातील संचारबंदी शिथील; मात्र इंटरनेट सेवा अजूनही बंदच! - आसाम इंटरनेट बंदी

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. आसाममध्ये या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर, राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तर, राज्यात संचारबंदीही लागू करण्यात आली होती.

#CAA Protest Assam
#CAA आंदोलन आसाम : काही भागातील संचारबंदी शिथील; मात्र इंटरनेट सेवा अजूनही बंदच!

By

Published : Dec 16, 2019, 12:38 PM IST

गुवाहाटी - आसाममधील गुवाहाटी आणि दिलबर्ग जिल्ह्यामधील संचारबंदी शिथील करण्यात आली आहे. सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत संचारबंदी उठवण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे, दहा जिल्ह्यांमधील इंटरनेट बंदी आणखी २४ तासांसाठी वाढवण्यात आली आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. आसाममध्ये या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर, राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तर, राज्यात संचारबंदीही लागू करण्यात आली होती.

दरम्यान, देशभरात या आंदोलनाचे लोण पसरले आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्लीमध्येही आंदोलनाने हिंसक वळण घेतले.

हेही वाचा : #CAA आंदोलन : अलिगढमधील इंटरनेट सेवा बंद; मुस्लीम विद्यापीठाच्या सुट्ट्याही तातडीने जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details