नवी दिल्ली – चीनने साम्राज्यवादी धोरण अजूनही सुरुच ठेवले आहे. चीनने भारताचा जुना मित्र देश असलेल्या भूतानबरोबर सीमावाद उकरून काढला आहे. जागतिक पर्यावरण सुविधेची (जीईएफ) जूनच्या पहिल्या आठवड्यात बैठक झाली. या बैठकीत चीनने भारत-भूतान सीमेवर असलेल्या साकटेंग प्राणी अभयारण्याच्या (एसडब्ल्यूएस) जागेवरून आक्षेप नोंदविला.
एकीकडे जग कोरोनाच्या संकटाबरोबर लढत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे मूळ ठिकाण असलेल्या चीनने भारतासह विविध देशांबरोबर सीमेवरून वाद करण्यास सुरुवात केली आहे.
माध्यमाच्या वृत्तानुसार जीईएफ परिषदेने जगभरातील विविध पर्यावरण प्रकल्पासाठी निधी जमविण्याचा निर्णय घेता आहे. मात्र, चीनने भूतानमधील अभयारण्यावरून आक्षेप नोंदविल्याने जीईएफला धक्का बसला. जीईएफच्या सदस्यांनी चीनचा आक्षेप ऑनलाईन बैठकीत तत्काळ खोडून काढला. यावेळी त्यांनी भूतानला पाठिंबा दिला. चीनने आक्षेप घेवूनही जीईएफ परिषदेने भूतानमधील अभयारण्यासाठी कार्यक्रमाचा कच्चा आराखडा स्वीकारला आहे.