महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'काश्मीर हा भारत-पाकिस्तान दरम्यानचा द्विपक्षीय मुद्दा' - काश्मीर प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प

काश्मीरचे प्रकरण भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे द्विपक्षीय प्रकरण आहे. त्यामुळे हे प्रकरण द्विपक्षीय पद्धतीने सोडवण्यात यायला हवे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार म्हणाले.

रविश कुमार
रविश कुमार

By

Published : Jan 23, 2020, 7:17 PM IST

नवी दिल्ली - स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित 'वर्ड इकॉनॉमिक फोरम'मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केला. त्यावर 'काश्मीरबाबतीत आमची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. काश्मीर हे भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे द्विपक्षीय प्रकरण असून यामध्ये तिसऱ्या पक्षाला हस्तक्षेप करण्यास मुभा नाही', असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काश्मीर हे भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे द्विपक्षीय प्रकरण आहे. त्यामुळे हे प्रकरण द्विपक्षीय पद्धतीने सोडवण्यात यायला हवे. दोन्ही देशांदरम्यान चर्चेसाठी अनुकूल वातावरण तयार करणे पाकिस्तानचे कर्तव्य आहे, असे कुमार म्हणाले.

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित 'वर्ड इकॉनॉमिक फोरम'मध्ये भारत- पाकिस्तान संबधीत काश्मीर मुद्द्यावरही चर्चा झाली. भारत आणि पाकिस्तान संबंधित महत्त्वाच्या काश्मीर मुद्द्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड यांनी केले.

पाकिस्तानकडून काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्यावरून मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव अनेक वेळा मांडला आहे. मात्र, काश्मीर प्रश्न दोन्ही देशांमधील वाद असून यामध्ये तिसरे कोणी पडण्यास भारताने कायम विरोध केला आहे. काश्मीर प्रश्न द्विपक्षीय असल्याची कायमच भारताची भूमिका राहिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details