महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आज..आत्ता..सकाळी ९ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्या

जोरदार पावसामुळे मालाड पूर्व परिसरात असलेल्या कुरार पिंपरीपाडा येथील झोपडपट्टीवर भिंत कोसळली. पावसामुळे आंबेगाव येथील सिंहगड महाविद्यालयाची सीमाभिंत मजुरांच्या झोपड्यांवर कोसळून मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या भीषण दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. कल्याण पश्चिम कडील दुर्गाडी किल्ल्यासमोर समोरील नॅशनल उर्दू हायस्कुलची संरक्षण भिंत कोसळून घरावर पडल्याने ३ जणांचा मृत्यू झाला आहे.सायन-माटुंगा-कुर्लादरम्यान ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने पुढील सुचना मिळेपर्यंत या मार्गावर एकही लोकल धावणार नसल्याचे मध्यरेल्वेने स्पष्ट केले आहे.अनेक भागात पाणी साचल्यामुळे मुंबईसह ठाणे आणि कोकण भागातील खाजगी आणि सरकारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

By

Published : Jul 2, 2019, 9:15 AM IST

मॉर्निंग बुलेटिन

LIVE : मुंबईतील मालाड परिसरात संरक्षक भिंत कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू; मदतकार्य सुरू

मुंबई- मुसळधार पावसामुळे मालाड पूर्व परिसरात असलेल्या कुरार पिंपरीपाडा येथील झोपडपट्टीवर भिंत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला. तर, १३ जण जखमी झाले आहेत. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.वाचा सविस्तर

पुण्यातील सिंहगड महाविद्यालयाची संरक्षण भिंत कोसळली, 6 जणाचा मृत्यू

पुणे -कोंढव्यातील 15 जणांचा बळी घेणारी दुर्घटना ताजी असतानाच त्याची पुनरावृत्ती झाल्याची आणखी एक घटना घडली. मुसळधार पावसामुळे आंबेगाव येथील सिंहगड महाविद्यालयाची सीमाभिंत मजुरांच्या झोपड्यांवर कोसळून मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या भीषण दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर..

कल्याणमध्ये नॅशनल उर्दू हायस्कुलची संरक्षण भिंत कोसळून ३ जणांचा मृत्यू

मुंबई - कल्याण पश्चिम कडील दुर्गाडी किल्ल्यासमोर समोरील नॅशनल उर्दू हायस्कुलची संरक्षण भिंत कोसळून घरावर पडल्याने ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर..

मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, पुढील सुचना मिळेपर्यंत कोणतीही लोकल धावणार नाही

मुंबई - गेल्या चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाने मुंबईची अक्षरशः तुंबई केली आहे. याचा परिणाम उपनगरीय रेल्वेवर झाला आहे. सीएसटी-ठाणे आणि सीएसटी-वाशीपर्यंतची लोकल सेवा पुर्णतः ठप्प झाली आहे. सायन-माटुंगा-कुर्लादरम्यान ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने पुढील सुचना मिळेपर्यंत या मार्गावर एकही लोकल धावणार नसल्याचे मध्यरेल्वेने स्पष्ट केले आहे. तसेच शासनाकडून मुंबईत आठवडाभरासाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर..

पावसाने उडवली दाणादाण; मुंबईसह ठाणे, कोकण भागातील शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई -गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकलसेवेवरही मुसळधार पावसाचा परिणाम जाणवत आहे. तसेच, अनेक भागात पाणी साचल्यामुळे मुंबईसह ठाणे आणि कोकण भागातील खाजगी आणि सरकारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.वाचा सविस्तर..

ABOUT THE AUTHOR

...view details