गुवाहाटी – ईशान्य भारतातही कोरोनाने थैमान माजवायला सुरुवात केली आहे. आसाममध्ये एकाच दिवशी 936 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. ही माहिती आसामचे आरोग्य मंत्री हिंमत विश्व शर्मा यांनी दिली.
आसामची राजधानी गुवाहाटीत कोरोनाचे नवे 521 रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोनाचे एकूण 15 हजार 536 रुग्ण आहेत. त्यामधील 9 हजार 848 रुग्ण बरे झाले आहेत. तर 5 हजार 650 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 35 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.