महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत आता अंतराळातही चौकीदारी करण्यास सक्षम - पंतप्रधान मोदी - BJP

लोकसभा निवडणुकांसाठी केवळ २ आठवडे शिल्लक आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. पंतप्रधान मोदी एकीकडे सभा गाजवत आहेत आणि ५ वर्षात त्यांनी केलेल्या कार्याचा पाढा जनतेसमोर वाचत आहेत.

ओडिशा भाजपचे कार्यकर्ते मोदींचे स्वागत करताना

By

Published : Mar 29, 2019, 4:39 PM IST

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान मोदींनी प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. आज त्यांनी ओडिशाच्या कोरापूट येथे जनसभेला संबोधित केले. दरम्यान, अपल्या सरकारच्या यशाचे खरे वारसदार देशातील जनता आहे, असे ते यावेळी म्हणाले. तर, आता भारत अंतराळातही चौकीदारी करण्यास सक्षम झाला आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.


लोकसभा निवडणुकांसाठी केवळ २ आठवडे शिल्लक आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. पंतप्रधान मोदी एकीकडे सभा गाजवत आहेत आणि ५ वर्षात त्यांनी केलेल्या कार्याचा पाढा जनतेसमोर वाचत आहेत. नुकतेच भारताने मिशन शक्ती नावाखाली आकाशातील उपग्रह क्षेपणास्त्राच्या मदतीने पाडण्यात यश मिळवले आहे. त्यावरूनही पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केले.


ओडिशा एका ऐतिहासिक यशाचे साक्षीदार झाले आहे. दोन दिवसांपूर्वी भारताने जगासमोर सामर्थ्याचे प्रदर्शन केले. आता आपण अंतराळातही चौकीदारी करण्यास सक्षम झाले आहोत, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. २०१४ च्या निवडणुकांमध्ये येथे आलो तेव्हा संपूर्ण निष्ठेसह आपली सेवा करण्याचे मी वचन दिले होते. तुम्ही आताही मला आशीर्वाद दिले नाही तर, मी तुमच्यासोबत काम कसे करणार, असेही मोदी यावेळी म्हणाले.

ओडिशामध्ये ८ लाख गरीब कुटुंबीयांना मी पक्के घर दिले आहे. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ४० लाख घरांमध्ये गॅस जोडणी दिली आहे. ३ हजार गावांना विज देण्याचे कामही मी केले. त्यासाठी तुमच्या आशीर्वादानेच मला प्रेरणा मिळाली, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details