महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ममतांचे डॉक्टरांना आवाहन; कामावर रुजू व्हा, कोणतीही कारवाई होणार नाही

ममतांनी डॉक्टरांना बैठकीचे निमंत्रणही दिले होते. परंतु, डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले नव्हते. ममतांनी संपावर बसलेल्या डॉक्टरांना पत्र लिहित डॉक्टरांना लवकरात लवकर संप मिटवावा, असे अपील केले आहे.

By

Published : Jun 15, 2019, 7:36 PM IST

Updated : Jun 15, 2019, 7:44 PM IST

ममता बॅनर्जी

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी सलग पाचव्या दिवशी संप ठेवाल आहे. त्यामुळे राज्यासह देशातही आरोग्यसेवांवर विपरीत परिणाम होत आहेत. डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले नाहीतर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. यानतंर, त्यांनी बैठकीचे निमंत्रणही दिले होते. परंतु, डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले नव्हते. डॉक्टर ममतांच्या माफीवर अडून बसले आहेत.

ममतांनी संपावर बसलेल्या डॉक्टरांना पत्र लिहित डॉक्टरांना लवकरात लवकर संप मिटवावा, असे अपील केले आहे. कामावर रुजू झाल्यानंतर कोणतीही कारवाई करणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. परंतु, डॉक्टरांनी प्रत्युत्तरात त्यांना नवीन मागण्यांची लिस्ट दिली आहे. यावर, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात संपावर असलेल्या डॉक्टरांनी ममतांना ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. याबरोबरच त्यांनी ममतांना माफी मागण्यास सांगितले आहे. एम्सचे डॉक्टर म्हणाले, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, रविवारी १४ रुग्णालयात ओपीडी आणि सर्जरी बंद करणार आहोत.

डॉक्टरांच्या अटी

१. ममतांनी जखमी डॉक्टरांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल निषेध जाहीर केला पाहिजे.
२. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वत: लवकरात लवकर हस्तक्षेप करावा.
३. सोमवारी रात्री डॉक्टरांना सुरक्षा पुरवताना पोलिसांच्या निष्क्रियेतेची न्यायालयीन चौकशी करावी.
४. हल्लेखोरांवर केलेल्या कारवाईची पूर्ण माहिती द्यावी.
५. राज्यात ज्युनिअर डॉक्टर आणि विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत.
६. सर्व वैद्यकीय महाविद्यालयात सशस्त्र बलाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.

Last Updated : Jun 15, 2019, 7:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details