महाराष्ट्र

maharashtra

मध्यप्रदेशमध्ये महामार्गावर झालेल्या अपघातात लातूरच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

By

Published : Aug 23, 2019, 1:31 PM IST

Updated : Aug 23, 2019, 3:34 PM IST

मध्यप्रदेश राज्यातील रतलाम जिल्ह्यातील महामार्गावर झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील लातूर येथील एकाच कुटूंबातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर इतर 5 जण जखमी झाले आहेत.

मध्यप्रदेशमध्ये महामार्गावर झालेल्या अपघातात लातूरच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

भोपाळ - मध्यप्रदेशमधील रतलाम जिल्ह्यात महामार्गावर झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील लातूरच्या नामजना गावातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या एका ट्रकला या प्रवाशांची चारचाकी धडकल्याने हा अपघात झाला आहे.

मध्यप्रदेशमध्ये महामार्गावर झालेल्या अपघातात लातूरच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

या घटनेनंतर जवळच्या ग्रामस्थांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. हे सर्वजण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील नामजना गावचे रहिवासी असून ते अजमेरहून त्यांच्या गावी जात होते. गावाकडे परतत असताना हा अपघात झाला आहे. रतलामच्या धारद गावाजवळील महामार्गावर हि घटना घडली असून बिलपंक पोलिस स्टेशनचे अधिकारी पूढील तपास करत आहेत.

Last Updated : Aug 23, 2019, 3:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details