महाराष्ट्र

maharashtra

झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६२. ४० टक्के मतदान; नक्षलवाद्यांना न घाबरता नागरिक घराबाहेर

By

Published : Dec 7, 2019, 9:09 PM IST

झारंखड विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा आज (शनिवारी) पार पडला. २० जागांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी ६२. ४० टक्के मतदान झाले.

jharkhand polls
झारखंड विधानसभा मतदान

रांची - झारंखड विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा आज (शनिवारी) पार पडला. २० जागांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी ६२. ४० टक्के मतदान झाले. राज्याच्या निवडणुका ५ टप्प्यांमध्ये होणार असून तीन टप्पे अजून बाकी आहेत. मतदानावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी केले मतदान

सर्वात जास्त मतदान (७४.४४ टक्के) बहरागोडा विधानसभा मतदार संघात झाले. तर सर्वात कमी मतदान (४६.४० टक्के) जमशेदपूर पश्चिम मतदार संघात झाले. नक्षलावाद्यांना न घाबरता मोठ्या संख्येने नागरिक मतदान करण्यासाठी बाहेर पडले होते. झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनीही आज मतदान केले.

मतदान झाल्यानंतर माघारी परतत असेलल्या पोलीस ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. ही घटना खुंटी येथील मारंगबुरू भागामध्ये घडली. पोलिसांनीही या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. घटनदाट जंगलामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. एका जवानाला गोळी लागल्याची माहिती पुढे आली आहे.

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री रघुवर दास, सरयू राय, राजा पीटर आणि नक्षलवादी कुंदन हे आपले नशीब आजमवनार आहेत. झारखंडमध्ये एकूण १९ जिल्हे नक्षल प्रभावित असून त्यातील ६७ मतदारसंघ नक्षलग्रस्त आहेत. पूर्व जमशेदपूर मतदारसंघ आणि पश्चिम जमशेदपूर मतदारसंघात सायंकाळी पाच पर्यंत मतदान सुरू राहणार आहे.

येत्या ५ जानेवारीला झारखंड विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. यापुर्वी ३० नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यासाठी मतदान झाले आहे. १२ डिसेंबरला तिसऱ्या, १६ डिसेंबरला चौथ्या आणि २० डिसेंबरला पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार असून २३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details