महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 18, 2020, 7:52 PM IST

ETV Bharat / bharat

देशाला पाहिजेत आणखी शंभर उपग्रह!

देशाचा आवाका लक्षात घेता संशोधन, संप्रेषण आणि दळण-वळण क्षेत्रात आणखी प्रगती करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत-जास्त उपग्रहांची गरज आहे, असे इस्रोचे (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) माजी अध्यक्ष डॉ. किरण कुमार यांनी सांगितले.

डॉ. किरण कुमार
डॉ. किरण कुमार

नवी दिल्ली -आपल्या देशाच्या विविध गरजा भागवण्यासाठी आणखी शंभर उपग्रहांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन इस्रोचे (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) माजी अध्यक्ष डॉ. किरण कुमार यांनी केले. नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.


देशाचा आवाका लक्षात घेता संशोधन, संप्रेषण आणि दळण-वळण क्षेत्रात आणखी प्रगती करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत-जास्त उपग्रहांची गरज आहे. सध्या भारताकडे 55 उपग्रह आहेत. येणाऱ्या काळात आणखी 100 उपग्रहांची गरज देशाला आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा - जम्मू आणि काश्मीर : प्रीपेड मोबाईलवरील 'व्हाईस कॉल' व एसएमएस सेवा पूर्ववत


आत्तापर्यंत इस्रोने 327 उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. त्यात 34 देशांच्या उपग्रहांचाही समावेश आहे. पीएसएलव्ही-सी37 सारखे एकाच वेळी 104 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण पुर्ण केले. यावरून इस्त्रोची कार्य क्षमता लक्षात येते. मात्र, यावरच थांबून चालणार नाही, असे इस्रोचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details