महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'भारत-जपानच्या चांगल्या संबंधांतून होणार नव्या तंत्रज्ञानाची निर्मिती; जगाला होणार फायदा' - मोदी आबे चर्चा

जपानचे पंतप्रधान आणि माझे मित्र शिंजो अ‌ॅबे यांच्यासोबत चांगली चर्चा झाली. भारत आणि जपानमध्ये असलेले हे विशेष संबंध आणि जागतिक भागिदारी नक्कीच भविष्यासाठी उपयोगाची ठरणार आहे. यातूनच कोरोना-नंतरच्या जगासाठी नवनवीन तंत्रज्ञान आणि उपाय तयार होण्यास चालना मिळेल.

'India-Japan partnership can help develop new tech for post-COVID world'
'India-Japan partnership can help develop new tech for post-COVID world'

By

Published : Apr 10, 2020, 3:50 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जपानचे पंतप्रधान शिंजो अ‌ॅबे यांच्या सोबत कोरोनाबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. भारत आणि जपानच्या संबंधांमुळे तसेच जागतिक भागीदारीमुळे कोरोना-नंतरच्या जगासाठी नवीन तंत्रज्ञान आणि उपाय विकसीत होण्यासाठी मदत होईल.

जपानचे पंतप्रधान आणि माझे मित्र शिंजो अ‌ॅबे यांच्यासोबत चांगली चर्चा झाली. भारत आणि जपानमध्ये असलेले हे विशेष संबंध आणि जागतिक भागिदारी नक्कीच भविष्यासाठी उपयोगाची ठरणार आहे. यातूनच कोरोना-नंतरच्या जगासाठी नवनवीन तंत्रज्ञान आणि उपाय तयार होण्यास चालना मिळेल. याचा फायदा या दोन्ही देशातील नागरिकांना, इंडो-पॅसिफिक भागातील नागरिकांना, तसेच संपूर्ण जगाला होणार आहे. अशा आशयाचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.

जपानचे पंतप्रधान शिंजो अ‌ॅबे यांनी एका महिन्यासाठी राजधानी टोकियो आणि इतर सहा प्रांतामध्ये आणीबाणी घोषित केली आहे. जगभर कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता, त्यांनी मंगळवारी हा निर्णय घेतला. आणीबाणीबाबत घोषणा करतानाच अ‌ॅबे यांनी असे जाहीर केले, की युरोपीय देशांप्रमाणे जपानमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात येणार नाही. या आणीबाणीमध्ये टोकियोचे राज्यपाल आणि इतर सहा प्रांतांचे प्रमुख यांच्याकडे ही जबाबदारी असेल, की त्यांनी जास्तीत जास्त लोकांना सोशल डिस्टन्सिंगसाठी प्रोत्साहित करावे.

हेही वाचा :कोरोना संकटाच्या काळात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे राहुल गांधींनी केले कौतूक

ABOUT THE AUTHOR

...view details