हैदराबाद - भारतामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 23 तारखेला देशभर टाळेबंदीची घोषणा केली. आज 17 दिवस झाले, देशभरातील अत्यावश्यक सेवेसंबंधी उद्योग सोडता सर्व बाजारपेठा, हॉटेल, वाहतूक, मद्यगृहे, शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रीय स्तरावरील खाद्य आणि पेय क्षेत्रातील तब्बल 20 टक्के कामगारांचा रोजगार जाण्याची भीती नॅशनल रेस्टॉरंट असोशिएसन ऑफ इंडिया (एनआरएआई) या संस्थने वर्तवला आहे.
देशभरात अप्रत्यक्ष व प्रत्यक्षपणे खाद्य आणि पेय क्षेत्र 7 लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार देते. या क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील वाटा 4 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. अशी माहिती एनआरएआई चे अध्यक्ष अनुराग कटियार यांनी दिली.