कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये एनआरसी लागू होऊ देणार नाही, असे दिदी (ममता बॅनर्जी) म्हणत आहेत. मात्र, मी तुम्हाला खात्री देतो, की भारतातील प्रत्येक घुसखोरांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज कोलकात्यामध्ये बोलताना हे स्पष्ट केले.
'भारतातील घुसखोरांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल' - TMC MLA Sabyasachi Dutta
तृणमूल काँग्रेसचे आमदार सब्यसाची दत्ता यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये एनआरसी लागू होण्याचे संकेत दिले आहेत.
!['भारतातील घुसखोरांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4614974-thumbnail-3x2-amit-shah.jpg)
पश्चिम बंगाल एनआरसी
हेही वाचा : चोवीस तासांच्या आत पाकिस्तानकडून दोनदा शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान जखमी
यावेळी बोलताना शाह म्हणाले, पश्चिम बंगाल आणि कलम ३७० यांचे विशेष नाते आहे. कारण, बंगालच्या मातीत जन्मलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनीच 'एक निशाण, एक विधान और एक प्रधान' अशी घोषणा केली होती.
हेही वाचा : कलम ३७० : मोदींनी घेतलेल्या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेवर होणार १४ नोव्हेंबरला सुनावणी