नवी दिल्ली - मरकज प्रकरणासाठी सर्व मुस्लिम समाजाला जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे मत राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाने(एनसीएम) मांडले आहे. मागच्या महिन्यात दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलिगी जमातने मरकजचे आयोजन केले होते. त्यामुळे देशातील कोरोना प्रादुर्भावाला बळ मिळाले. ही नक्कीच वाईट गोष्ट आहे मात्र, यामुळे संपूर्ण समाजाला जबाबदार धरणे हे ही चुकीचे आहे.
राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाचे सहसचिव डॅनियल ई. रिर्चड यांनी प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोचे संचालक के. एस. धतवालिया यांना याबाबत एक पत्र लिहले आहे. माध्यमांत मरकज प्रकरणाचे वास्तविक स्वरुप दाखवणे गरजेचे झाले आहे. या प्रकरणामुळे देशातील मुस्लिम समाजाकडे अपराध्यासारखे पाहिले जात आहे.