नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. विश्व हिंदू महासभेचे उत्तर प्रदेश अध्यक्ष रणजीत बच्चन यांची राजधानी लखनौमधील हजरतगंज येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ते सकाळी फिरण्यासाठी बाहेर गेले असता दुचाकीस्वारांनी त्यांना गोळ्या घातल्या.
रणजीत बच्चन सकाळी 6 वाजता आशीष श्रीवास्तव यांच्यासोबत प्रभात फेरीसाठी गेले होते. त्यावेळी दुचाकीस्वारांनी ग्लोब पार्कजवळ त्याच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोक्याला गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला आहे. तर आशीष श्रीवास्तव देखील जखमी झाले असून त्यांना ट्रॉमा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा -छत्तीसगढमध्ये सैनिकांकडून एकमेकावर गोळीबार, 1 जणांचा मृत्यू तर 2 जण जखमी
विश्व हिंदू महासभेच्या उत्तर प्रदेश अध्यक्षांची गोळी घालून हत्या - Ranjit Bachchan news
विश्व हिंदू महासभेचे उत्तर प्रदेश अध्यक्ष रणजीत बच्चन यांची राजधानी लखनौमधील हजरतगंज येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

रणजीत बच्चन
दरम्यान, गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. रणजीत बच्चन गोरखपूर येथील रहिवासी असून ओसीआर येथील इमारतीमधील बी-ब्लॉकमध्ये राहत होते. गेल्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये हिंदू समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची हत्या करण्यात आली होती.
हेही वाचा -'गोमूत्र आणि शेणाद्वारे केला जाऊ शकतो कोरोना विषाणूवर उपचार '