महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 30, 2019, 9:00 PM IST

Updated : Sep 30, 2019, 11:50 PM IST

ETV Bharat / bharat

गुजरातमध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसला भीषण अपघात, २१ ठार

अंबाजीजवळच्या त्रिशुलिया घाटाजवळ या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला. या अपघातात तब्बल २१ जण ठार झाले. मुसळधार पावसामुळे बस घसरून अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

गुजरातमध्ये बसला भीषण अपघात

बनासकंठा - गुजरातमधील बनासकंठा जिल्ह्यातील अंबाजी तीर्थस्थानाजवळ एका बसला भीषण अपघात झाला. येथील अंबाजीजवळच्या त्रिशुलिया घाटाजवळ या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला. या अपघातात तब्बल २१ जण ठार झाले. मुसळधार पावसामुळे बस घसरून अपघात झाल्याचे सांगण्यात आले. पोलीस महाअधीक्षक अजित रायजन यांनी अपघाताविषयी माहिती दिली.

गुजरातमध्ये बसला भीषण अपघात

याआधी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी एस. जी. शाह यांनी या अपघातात १८ जण ठार झाल्याची माहिती दिली होती. तसेच, बसमधील ३० जण जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले होते.

अपघात झाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसखाली अडकलेल्या लोकांना काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Last Updated : Sep 30, 2019, 11:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details