महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आसामला पुन्हा पुराचा फटका; चार जिल्ह्यांमधील ३४ हजार लोक बाधित, एकाचा मृत्यू - आसाम पूर ३४ हजार बाधित

धेमाजी, लख्मीपूर, बिसवनाथ आणि चिरंग या चार जिल्ह्यामधील सुमारे ३४ हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ४,२०० हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आसाममध्ये पुरामुळे ११३ लोकांचा जीव गेला होता. तर मे महिन्यापासून झालेल्या भूस्खलनांच्या घटनांमध्ये आतापर्यंत २६ जणांचा बळी गेला आहे.

Fresh floods in 4 Assam districts hit 34K people, one killed
आसामला पुन्हा पुराचा फटका; चार जिल्ह्यांमधील ३४ हजार लोक बाधित, एकाचा मृत्यू

By

Published : Sep 15, 2020, 11:09 AM IST

गुवाहाटी :आसामला जवळपास महिनाभरानंतर पुन्हा एकदा पुराचा फटका बसला आहे. चार जिल्ह्यांमधील ३४ हजार लोक पूरबाधित आहेत, तर आतापर्यंत एकाचा मृत्यूही झाला असल्याची माहिती आसामच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

धेमाजी, लख्मीपूर, बिसवनाथ आणि चिरंग या चार जिल्ह्यामधील सुमारे ३४ हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ४,२०० हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आसाममध्ये पुरामुळे ११३ लोकांचा जीव गेला होता. तर मे महिन्यापासून झालेल्या भूस्खलनांच्या घटनांमध्ये आतापर्यंत २६ जणांचा बळी गेला आहे.

ऑगस्टमध्ये राज्यातील ३३ पैकी ३० जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्त स्थिती होती. ज्याचा ५७ लाखांहून अधिक लोकांना फटका बसला होता. ऑगस्टच्या शेवटी उसंत घेतलेल्या पावसाने सप्टेंबरमध्ये पुन्हा हजेरी लावल्याने आता चार जिल्ह्यांमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा :विधान परिषद बरखास्त करण्याचा निर्णय त्वरित घ्या; आंध्र सरकारची केंद्राकडे मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details