श्रीनगर - जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आले आहे. त्यानंतर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे श्रीनगरमधील नेहमीच वर्दळीचे राहणारे संडे मार्केट रविवारी बंद होते.
कलम 370 : काश्मीरमधील वर्दळीचे राहणारे संडे मार्केट बंद - Famous Sunday
श्रीनगरमधील नेहमीच वर्दळीचे राहणारे संडे मार्केट रविवारी बंद होते.
![कलम 370 : काश्मीरमधील वर्दळीचे राहणारे संडे मार्केट बंद](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4245471-thumbnail-3x2-jk.jpg)
काश्मीरमधील लोक संडे मार्केटमध्ये आपल्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करत. या बाजारमध्ये काश्मीरची शान असलेल्या काश्मीरी शॉल विकायला असत. पर्यटक येथूनच विविध वस्तू खरेदी करत. या बाजारमध्ये खास मसाला रोटी सह वेगवेगळ्या खाण्याची पदार्थ मिळत. मात्र सध्या हा बाजार बंद असून नेहमच वर्दळ असलेल्या या मार्केटमध्ये शांताता पाहायला मिळत आहे.
३७० कलम रद्द केल्यानंतर राज्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सरकारकडून 35 हजारांपेक्षा जास्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.