महाराष्ट्र

maharashtra

जेईई, नीटच्या परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी, वर्ष वाया गेल्यास भविष्यात नुकसान होण्याची भीती

By

Published : Aug 28, 2020, 2:43 PM IST

जेईई, नीट २०२० च्या परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. या परीक्षांसाठी लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांची प्रवेशपत्रे यापूर्वीच डाऊनलोड केली आहेत. यावरून विद्यार्थी परीक्षा देण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.

जेईई
जेईई

नवी दिल्ली - अंतिम वर्ष परीक्षांच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो, मात्र परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विविध राज्यांमधून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. जेईई, नीट २०२० च्या परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. या परीक्षांसाठी लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांची प्रवेशपत्रे यापूर्वीच डाऊनलोड केली आहेत. यावरून विद्यार्थी परीक्षा देण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

बिगरभाजप जवळपास सहा राज्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. मात्र, ईटीव्ही भारतकडून विद्यार्थ्यांचे मत लक्षात घेतले असता अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा होणे गरजेचे असून आम्ही परीक्षेची तयारी केली असल्याचे सांगितले आहे.

ईटीव्ही भारतशी बोलताना मो. अफसर अली म्हणाले, कोरोनाचा विचार करता 'एनटीए'ने परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत. आम्ही परीक्षेसाठी बरीच तयारी केली आहे आणि ही चांगली बातमी आहे की, आमच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

हेही वाचा -जेईई-नीट परीक्षा व्हाव्यात ही विद्यार्थी आणि पालकांचीही इच्छा - पोखरियाल

कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देशभरातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे १६ मार्चपासून बंद आहेत. खूप दिवसांनंतर आम्ही आमच्या बेंचवर बसू शकणार आहोत. आमची परीक्षांची तयारीही चांगली झाली आहे. जेईई आणि नीटच्या परीक्षेला सामोरे जाण्यास आम्हाला आनंद होईल, असे अभिजित यादव या विद्यार्थ्याने सांगितले.

परीक्षा घेण्यास उशीर करणे किंवा त्या पुढे ढकलणे भविष्यात धोकादायक ठरू शकते. आम्ही संपूर्ण वर्षभर परीक्षेची तयारी केली आहे आणि कोरोनामुळे आम्हाला परीक्षा गमावण्याची इच्छा नाही. परीक्षांवेळी सरकारने योग्य अंमलबजावणी करावी आणि परीक्षा घ्यावी, असे विद्यार्थिनी रिया सेनगुप्ता म्हणाली.

परीक्षेच्या आधी व नंतर परीक्षा केंद्रावर स्वच्छता करण्यापासून ते विद्यार्थ्यांना मास्क हातमोजे उपलब्ध करून देण्यापर्यंतच्या सर्व विस्तृत सुरक्षा उपायांची माहिती सरकारने दिली आहे. आपण मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून परीक्षा दिली पाहिजे, असे कृतिका कसात ही विद्यार्थी म्हणाली.

ABOUT THE AUTHOR

...view details