महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सीपीआय (एम) विरूद्ध सीपीआय (एमएल) : बिहारमध्ये 'मैत्री' तर बंगालमध्ये 'वैर' - महासचिव दीपांकर भट्टाचार्य

बिहार विधानसभा निवडणुकीप्रमाणेच पश्चिम बंगालमध्येही डावे पक्ष बिहारमधील कामगिरी पुन्हा दाखवतील का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. मात्र, याबाबत दोन प्रमुख डाव्या पक्षांमध्येच मतभेद असल्याचे दिसून येत आहे.

पश्चिम बंगाल
पश्चिम बंगाल

By

Published : Nov 20, 2020, 7:44 PM IST

कोलकाता - बिहारमध्ये डावे पक्ष हे महाआघाडीमध्ये सामील होते. तेथे त्यांनी काँग्रेसपेक्षाही चांगली कामगिरी करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्येही असेच युती करून डावे पक्ष बिहारमधील कामगिरी पुन्हा दाखवतील का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. मात्र, याबाबत दोन प्रमुख डाव्या पक्षांमध्येच मतभेद असल्याचे दिसून येत आहे. त्यांचासमोर सध्याचा सर्वात मोठा प्रश्न हा आहे, की भाजपाला आपला मुख्य विरोधक मानावे, की तृणमूलला?

सीपीआय (एम) (मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी) आणि सीपीआय (एमएल) (भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी लेनिनवादी) या दोन्ही पक्षांमध्ये केवळ वैचारिक मतभेद असल्याचे यापूर्वी वाटत होते. मात्र, आता या दोघांमध्ये कोणाला विरोधक मानायचे यावरून मोठ्या प्रमाणात मतभेद तयार झाले आहेत. सीपीआय(एम)चे महासचिव सीताराम येचुरी यांच्यामते भाजपाशी लढायचे असेल, तर सर्वप्रथम आपल्याला तृणमूलला हरवायला हवे. तर, दुसरीकडे सीपीआय (एमएल)चे महासचिव दीपांकर भट्टाचार्य यांच्या मते आपला सर्वात मोठा शत्रू भाजपाच आहे. त्यामुळे देशभरात कशाही प्रकारे आपण भाजपाला थोपवायला हवे.

माले पॉलिटब्यूरोच्या सदस्या कविता कृष्णन यांनी या मुद्द्यावरुन सीपीआय (एम)ला उघड विरोध केला आहे. त्या म्हणाल्या, की मोदी आणि ममता यांना आपण एकच मानू शकत नाही. आज भाजपाशी लढा देण्याची ताकद (पश्चिम बंगालमध्ये) केवळ तृणमूलमध्ये आहे. त्यामुळे सीपीआय (एम) उगाचच 'दीदीभाई' आणि 'मोदीभाई' या मुद्द्याचा बाऊ करत असल्याचे कविता म्हणाल्या.

प्रतिस्पर्धी सांप्रदायिकताच्या मुद्यांवर भाजपा आणि तृणमूलवर आरोप लावण्याचा सीपीआय(एम)चा सिद्धांत पूर्णपणे चुकीचा आहे. कारण, सीपीआय(एम) कधीच प्रतिस्पर्धी हिंदूवादावर बोलत नाही. तर भाजपा हिंदूत्वाचा प्रचार करत आहेत. मात्र, वास्तवामध्ये भाजपा सीपीआय (एम)च्या सिद्धांताचा फायदा घेत आहे, असे माले नेता कविता म्हणाल्या.

सीपीआयएम पॉलिटब्युरो सदस्य आणि लेफ्ट फ्रंट अध्यक्ष बिमान बोस यांनी कविता कृष्णन यांच्या विधानाचा निषेध केला. ते म्हणाले की, आमची युती प. बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल दोघांनाही समान शत्रू मानते. दोघेही जनतेसाठी घातक आहेत. बोस म्हणाले की, प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु जर कोणी लेफ्ट फ्रंटसाठी असे बोलत असेल. तर त्याला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही.

डाव्या पक्षांमधील वादामुळे तृणमूल काँग्रेसने सावधानता बाळगली आहे. टीमएसी पक्ष उघडपणे काहीही बोलण्यास टाळाटाळ करीत आहे. टीएमसीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, काही दिवसांपूर्वीपर्यंत हेच लोक (बिहार निवडणूकीत) एकत्र होते. तृणमूलकडे माकपचा निश्चितपणे मवाळ दृष्टीकोन आहे. कारण, याचा फायदा घेत ते काही जागा जिंकू इच्छितात. मला याचा विचार करावा लागेल आणि युतीचा फायदा होतो का ते पहावे लागेल.

तृणमूलचे ज्येष्ठ नेते सौगता रॉय यांच्याशी या विषयावर चर्चा झाली. युतीबाबत अंतिम निर्णय ममता बॅनर्जी घेऊ शकतात. सीपीआयएम आणि सीपीआयएमएलमधील अंतर्गत वादावर मी काहीही बोलणार नाही. यावर मी काही बोलणे योग्य ठरणार नाही, असे त्या म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details