महाराष्ट्र

maharashtra

बिहार विधानसभा निवडणूका पुढे ढकलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

By

Published : Aug 28, 2020, 1:24 PM IST

बिहार विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमुर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने आज बिहार विधानसभा निवडणूका पुढे ढकलण्याची याचिकेवर सुनावणी केली.

सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बिहारमधील निवडणुका थांबवता येणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायमुर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने आज बिहार विधानसभा निवडणूका पुढे ढकलण्याची याचिकेवर सुनावणी केली.

निवडणूक आयोगाच्या प्रकियेत दखल देता येणार नाही. जोपर्यंत निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी केल्या जात नाहीत. तोपर्यंत न्यायालयाकडून यामध्ये हस्तक्षेप केला जाऊ शकत नाही. निवडणूका पुढे ढकलण्यासाठी कोरोना हे वैध कारण नाही. मुख्य निवडणूक आयुक्तांना काय करावे हे, न्यायालय सांगू शकत नाही. निवडणूक आयोग संपूर्ण परिस्थितीची सुयोग्यरित्या हाताळले, असे न्यायालयाने म्हटलं आहे.

बिहार राज्यातील लोकसंख्येकडे भारतीय निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केले आहे. जर कोरोना काळात निवडणुका घेतल्यास राज्यात विषाणूचा प्रसार होण्यासच हातभार लागेल. तसेच राज्यातील लोकांनी नुकताच पूर परिस्थितीचा सामना केला आहे, असे याचिकेत म्हटले होते.

दरम्यान, बिहारमधील विधानसभा निवडणुका या येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपणार आहे. देशातील कोरोना परिस्थिती पाहता, निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकीसंदर्भात अंतिम निर्णय जाहीर केला नाहीये.

ABOUT THE AUTHOR

...view details