हैदराबाद- भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मागील 24 तासात देशात सर्वाधित 30 हजारांच्यावर कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशात कोरोनाबाधितांचा आतापर्यंतचा आकडा हा 9 लाख 68 हजार 876 इतका आहे. मागील 24 तासात 606 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता 24 हजार 915 इतकी झाली आहे.
- महाराष्ट्र
दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. अशातच आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात आज (शुक्रवार) कोरोनाचा उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक झाली आहे. आज ५ हजार ५२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६३ टक्के असून, आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५८ हजार १४० रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, आज कोरोनाच्या ८ हजार ६४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात १ लाख १४ हजार ६४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १४ लाख ४६ हजार ३८६ नमुन्यांपैकी २ लाख ८४ हजार २८१ नमुने पॉझिटिव्ह (१९.६५टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख १० हजार ३९४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ८३३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- बिहार
राज्यात एम्सने कोवॅक्सीनसाठी मानवी चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे. नालंदा मेडिकल कॉलेज व रुग्णालयात या मानवी चाचण्या करण्यात येणार आहेत. बिहारमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणीक वाढ होत आहे. यासाठी राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
- नवी दिल्ली