रायजूर - छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी स्थलांतरीत कामगारांच्या मुद्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा लगावला आहे. निर्मला सितारमन आपल्या सरकारने लाखो कामगारांचे जीवन उद्धवस्थ केले असल्याचे बघेल यांनी म्हटले आहे.
सरकारने लाखो कामगारांचे जीवन उद्धवस्थ केले - भूपेश बघेल - छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल न्यूज
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी स्थलांतरीत कामगारांच्या मुद्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा लगावला आहे.

भूपेश बघेल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभर लॉकडाऊन आहे. परराज्यातील अनेक मजूर आपल्या राज्यात अडकले आहेत. त्या मजुरांना आपापल्या घरी जायचे आहे. या मजुरांचे घरी जाताना अतोनात हाल होत आहेत. याच मद्यावरुन बघेल यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे एकूण जर प्रत्येक मजुरांच्या खात्यावर 7 हजार 500 रुपये टाकले असते तर त्यांचे हाल झाले नसते असे बघेल यांनी म्हटले आहे.