महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 8, 2020, 9:00 AM IST

Updated : Nov 8, 2020, 9:28 AM IST

ETV Bharat / bharat

90 तासांचे प्रयत्न व्यर्थ; बोअरवेलमधून काढलेल्या चिमुरड्याचा मृत्यू

मध्य प्रदेशच्या निवाडी जिल्ह्यातील सैतपुरा गावात बोअरवेलमध्ये अडकलेल्या पाच वर्षांच्या प्रल्हादाचा मृत्यू झाला आहे. सुमारे 90 तासांच्या संघर्षानंतर सैन्य आणि प्रशासनाला प्रल्हादाला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मध्य प्रदेश
मध्य प्रदेश

निवाडी - गेल्या चार दिवसांपासून बोअरवेलमध्ये अडकलेल्या पाच वर्षांच्या प्रल्हादाचा मृत्यू झाला आहे. बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर प्रल्हादाला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. मध्य प्रदेशच्या निवाडी जिल्ह्यातील सैतपुरा गावात बुधवारी सकाळी बोअरवेलमध्ये पडलेल्या प्रल्हाद नावाच्या मुलाला रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बाहेर काढण्यात आले.

बोअरवेलमधून काढलेल्या चिमुरड्याचा मृत्यू

सुमारे 90 तासांच्या संघर्षानंतर सैन्य आणि प्रशासनाला प्रल्हादाला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश आले. प्रल्हादा वाचविण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. तर राज्यातील लोकही प्रल्हादासाठी प्रार्थना करीत होते. बोरवेलमधून बाहेर काढल्यानंतर प्रल्हादाला डॉक्टरांच्या पथकाने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. जेथे तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.

घटनेचा पहिला दिवस -

बुधवारी निवाडीच्या पृथ्वीपूर सैतपुरा गावात पाच वर्षांचा प्रल्हाद बोअरवेलमध्ये पडला होता. माहिती मिळताच पोलिसांसह सैन्यदलही प्रल्हादाला वाचवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. बोअरवेल जवळ बोगदा बनवून मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आले.

प्रल्हाद बोअरवेलमध्ये कसा पडला ?

बुधवारी सकाळी 9.40 वाजता प्रल्हादा बोअरवेलमध्ये पडला. बोअरवेल झाकलेला होता. मात्र, प्रल्हादाने तो उघडल्यानंतर तो त्यात पडला. घटनेनंतर प्रल्हादला वाचवण्यासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी बोअरवेलमध्ये कॅमेरा टाकून प्रल्हादाची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

प्रल्हादाच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला

ऑक्सिजन पुरवला गेला -

जिल्हाधिकारी आशिष भार्गव आणि एसपी वाहिनी सिंह घटनास्थळी पोहोचले होते. बोअरवेलमधून प्रल्हादच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ नये म्हणून प्रल्हादाला सतत ऑक्सिजन पुरविला जात होता. सैन्य आणि एनडीआरएफकडून प्रल्हादाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

मुख्यमंत्र्यांच टि्वट -

प्रल्हादाला लवकरच बाहेर काढावे, अशी विनंती मुख्यमंत्री शिवराज यांनी केली. प्रल्हादाला वाचवण्यासाठी सैन्यासह स्थानिक प्रशासनही प्रयत्न करत आहे, अशी माहिती त्यांनी टि्वटद्वारे दिली.

माजी मुख्यमंत्र्यांच टि्वट -

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही प्रल्हादाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जावेत, अशी मागणी राज्य सरकारकडे टि्वटद्वारे केली.

घटनेचा दुसरा दिवस -

घटनेच्या रात्री लखनऊहून एनडीआरएफची टीम निवाडी येथे पोहोचली. तर एसडीआरएफ दुसर्‍या दिवशी घटनास्थळी पोहोचले. घटनेच्या दुसर्‍या दिवसापर्यंत प्रल्हादाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होते. टीकमगडचे खासदार वीरेंद्र खाटीक आणि निवाडीचे आमदार अनिल जैन घटनास्थळी पोहोचले होते. लोकप्रतिनिधी रात्रभर नातेवाईकांशी संवाद साधत मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात येईल, असा दिलासा देत होते.

प्रल्हादाला वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

तिसऱ्या दिवशी लागू केले कलम 144 -

घटनेच्या तिसर्‍या दिवशी प्रल्हादाला वाचविण्याचे प्रयत्न सुरूच होते. 60 फूटांपर्यंत खोदकाम केल्यावर रेल्वेकडून बोगदा बनविण्याचे मशीन मागविण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी आशिष भार्गव यांनी घटनास्थळावर कलम 144 लागू केले होते.

बोअरवेलमधून काढलेल्या चिमुरड्याचा मृत्यू

घटनेचा चौथा दिवस -

घटनेच्या चौथ्या दिवशी म्हणजे आज प्रशासनाने संपूर्ण गावात कलम 144 लागू केली आहे. 90 तास प्रयत्न करूनही प्रल्हादाला वाचवता आले नाही. जीवन आणि मृत्यूची लढाई लढणार्‍या प्रल्हादाला अखेर आपला जीव गमवावा लागला.

Last Updated : Nov 8, 2020, 9:28 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details