आग्रा (उत्तरप्रदेश) -भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ताजमहाल तसेच देशातील अन्य पर्यटनस्थळांच्या ऑनलाइन तिकीट प्रणालीमध्ये बदल केला आहे. आता एका वेळेला पाचच टिकीट नोंदणी करता येणार असून या तिकिटांवर पर्यटकांचे नावसुद्धा असणार आहे. तिकिटांमध्ये होणारा काळाबाजार तसेच पर्यटकांना होणारा त्रास लक्षात घेता एएसआईने हा निर्णय घेतला आहे. या नविन तिकीट प्रणालीमुळे तिकिटांच्या काळाबाजाराला आळा बसणार आहे. ताजमहाल बघायला येणाऱ्या पर्यटकांनी ऑनलाइन तिकीट नोंदणी करूनच यावे, असे आवाहन एएसआईने केले आहे.
मोठ्या प्रमाणात होत होता काळाबाजार -
आठवड्याच्या शेवटी ताजमहाल पहायला येणाऱ्या पर्यटकांमध्ये तिकिटांसाठी मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याने त्याचे नुकसान पर्यटकांना होत होते. त्यामुळे तिकीट न मिळाल्यामुळे ताजमहाल न बघता पर्यटाकांना माघारी जावे लागत असल्याने या तिकीट प्रणालीमध्ये बदल करण्यात यावे, अशी मागणी पर्यटकांकडून करण्यात येत होती. कोरोनामुळे 188 दिवस ताजमहाल तसेच आग्राचा किल्ला बंद होता. परंतु 17 मार्चपासून देशातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी उघडण्यात आली आहे. तसेच कोरोनामुळे दोन शिफ्टमध्ये पाच हजार पर्यटकांनाच ताजमहालमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.