नवी दिल्ली - कोरोना संकटामुळे लहान आणि मध्यम उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या ओळखून राज्य आणि केंद्र सरकारने त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी म्हटले. कोरोनामुळे देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लहान उद्योग बंद पडत आहेत, आधी त्यांच्या समस्या सरकारने सोडवाव्यात, असे त्या म्हणाल्या.
लहान आणि मध्यम उद्योगांतून कोट्यवधी लोकांना रोजगार मिळतो. त्यांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण झाला असून सरकारने त्यांना अडचणीतून बाहेर काढावे. सरकार नवे उद्योगधंदे सुरू करण्याची गोष्ट करत आहे. नवे उद्योग सुरू करण्यास आमचा विरोध नाही, मात्र, जे उद्योग आधीच सुरू आहेत, त्यांना सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे त्या म्हणाल्या.