नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत मजुरांचे हाल होत असून त्यांनी आपल्या घराची वाट धरली आहे. स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात सोडण्यासाठी सरकारकडून विशेष श्रमिक रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. आज उत्तर प्रदेशमधील मेरठ रेल्वे स्थानकांवर शेकडो स्थलांतरीत मजूर बिहारला परत जाण्यासाठी दाखल झाले.
आपल्या राज्यात परत जाण्यासाठी हजारो कामगार मेरठ रेल्वे स्थानकांवर जमले. पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वांना एकमेकांपासून सोशल डिस्टन्सं पाळण्याचे आवाहन केले. मात्र, हजारोच्या संख्येने लोक आल्यामुळे सोशल डिस्टंन्स पाळण्यातही अडचण येत आहे.