हैदराबाद - भारत आणि चीनमधील संबंध सीमाप्रश्नावरू सध्या ताणले आहेत. चिनी सैन्याने गलवान व्हॅलीमध्ये केलेल्या हल्ल्यात भारतीय जवानांना वीरमरण आल्यानंतर संपूर्ण देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. चीनचा निषेध म्हणून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. मात्र, चिनी मालावर बहिष्कार जरी घातला तरी त्यांच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही, असे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम म्हणाले.
भारत शक्य तितका स्वावलंबी बनला पाहिजे. मात्र, याचा अर्थ असा होत नाही की, संपूर्ण जगापासून आपण विलग व्हावे. सीमेवरील तणावामुळे आपण जागतिक व्यापाराची शृंखला तोडू शकत नाही. चीन सोबत व्यापारी संबंध तोडले तर बाजारपेठांवर मोठा ताण येईल. चीन फक्त भारतासोबतच व्यापार करत नाही. चीनच्या एकूण जागतिक व्यापाराचा भारत एक लहानसा भाग आहे. त्यामुळे भारताने चीनी मालावर बहिष्कार टाकला तरी, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर फारसा फरक पडणार नाही, असे चिंदबरम यांनी सांगितले.