महाराष्ट्र

maharashtra

'भाजपने लोकशाहीला ठार मारण्याची सुपारी घेतली', रणदीप सुरजेवाला यांचे टिकास्त्र

By

Published : Nov 23, 2019, 5:07 PM IST

काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे.

रणदीप सुरजेवाला

नवी दिल्ली - महाराष्ट्रामध्ये राजकीय नाट्यमय घडामोडींनी वेगळे वळण घेतले असून भाजपने आज सकाळी सत्ता स्थापन केली. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. 'भाजपने लोकशाहीला ठार मारण्याची सुपारी घेतली असून राज्यपाल हे पुन्हा एकदा शाह यांचे हिटमॅन असल्याचे स्पष्ट झालयं', असे सुरजेवाला यांनी टि्वट करून म्हटले आहे.


राज्यातील राष्ट्रपती शासन कधी हटवण्यात आले?, सत्ता स्थापनेचा दावा कधी करण्यात आला?, आमदारांची यादी राज्यपालांना कधी देण्यात आली?, आमदार राज्यपालांसमोर कधी हजर झाले?, चोरांसारखी का शपथ घेतली?, असे प्रश्न सुरजेवाला यांनी टि्वटमधून उपस्थित केले आहेत.


ज्यांना सिंचन सिंचन घोटाळा प्रकरणी तुरुंगात डांबणार होते. आता त्यांच्यासोबतच सत्ता स्थापन केली. सत्तेची हाव ही तत्वे आणि भष्ट्राचार धुऊन टाकते, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.


महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याबद्दल तिन्ही पक्षांतील नेते सकारात्मक असल्याचे चित्र होते. परंतु, सकाळी अचानक भाजपचे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details