नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने कोरोनाबाधितांची आणि मृत्यूची वास्तविक आकडेवारी सादर करण्याच्या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर निशाण साधला आहे. भाजप कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येवर घाणेरडे राजकारण करत आहे, असे सिसोदिया म्हणाले.
संवेदनशील विषयावर काही विरोधी नेत्यांनी सुरू केलेल्या राजकाराणाला दिल्ली उच्च न्यायालयाने थांबवले, याचा मला आनंद आहे, असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले. तसेच दिल्ली सरकार दररोज कोरोनाशी संबंधित योग्य आकडेवारी देत असल्याचेही ते म्हणाले.