लखीसराय - जिल्ह्यातील हलसी ठाणे पोलीस ठाणे परिक्षेत्रात एका ट्रकने अनेकांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात ८ जण ठार झाले. तर, ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या भरधाव ट्रकने ११ किलोवॅट विजेच्या खांबासह आणखी २ खांबांनाही धडक दिल्याने हे विद्युत प्रवाहित खांबही कोसळले आहेत.
बिहारमध्ये ट्रकच्या धडकेत ८ ठार, ५ गंभीर जखमी - बिहार न्यूज
घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये प्रचंड गोंधळ आणि आक्रोश सुरू झाला. ग्रामस्थांनी लखीसराय सिकंदरा मार्ग अडवून धरला. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी लोकांना समजावत रस्ता मोकळा केला.
![बिहारमध्ये ट्रकच्या धडकेत ८ ठार, ५ गंभीर जखमी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3805490-574-3805490-1562818400720.jpg)
अपघात
घटनास्थळी दुखी मांझी येथे लग्न समारंभ सुरू होता. येथे अनेक वऱ्हाडी आणि इतर काही लोक उपस्थित होते. भरधाव वेगाने सुटलेला ट्रक या सर्वांना चिरडत पुढे निघून गेला. यात ७ जण जागीच ठार झाले. एका व्यक्तीने रुग्णालयात उपाचारादरम्यान शेवटचा श्वास घेतला. ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला.
बिहारमध्ये ट्रकच्या धडकेत ८ ठार
घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये प्रचंड गोंधळ आणि आक्रोश सुरू झाला. ग्रामस्थांनी लखीसराय सिकंदरा मार्ग अडवून धरला. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी लोकांना समजावत रस्ता मोकळा केला.