महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 23, 2020, 6:50 AM IST

ETV Bharat / bharat

बिहार विधानसभा निवडणूक : आज पंतप्रधान मोदी, राहुल गांधींच्या तोफा धडाडणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे आज बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचार मैदानात उतरत आहेत. पंतप्रधान मोदी बिहार निवडणुकीत 12 सभांना संबोधित करणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार पंतप्रधानांच्या जवळपास सर्व सभांना उपस्थित राहणार असल्याचे भाजप नेत्याने सांगितले.

बिहार विधानसभा निवडणूक
बिहार विधानसभा निवडणूक

पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोरात सुरू आहे. सर्व पक्ष प्रचारामध्ये व्यस्त आहेत. आज (शुक्रवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही प्रचाराच्या मैदानात उतरत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मोहिमेची सुरुवात रोहतास जिल्ह्यातील डेहरीच्या बियाडा मैदानापासून करतील, तेथे ते एका सभेला संबोधित करतील. त्यानंतर ते गयाच्या गांधी मैदानावर पोहोचतील जिथे ते दुसर्‍या सभेला संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार निवडणुकीत 12 सभांना संबोधित करणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार पंतप्रधानांच्या जवळपास सर्व सभांना उपस्थित राहणार असल्याचे एका भाजप नेत्याने सांगितले.

हेही वाचा -रशियन स्पुटनिक लसीची चाचणी घेणाऱ्या डॉ. रेड्डी लॅबवर 'सायबर हल्ला'

तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज (शुक्रवारी) दोन सभांना संबोधित करतील. काँग्रेस नेते प्रेमचंद्र मिश्रा म्हणाले की, राहुल गांधी शुक्रवारी नवादा येथील हिनसुआ येथे आपली पहिली सभा घेतील. तर त्यांची दुसरी सभा कहलगाव येथे होईल. त्यांनी सांगितले की आरजेडी नेते तेजस्वी यादव हे त्यांच्या समवेत हिनसुआ येथे असतील.

पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी हे परस्परांवर टिका करण्याची संधी सोडणार नाहीत. त्याला हे दोन्ही नेते कशा पद्धतीने उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने आपल्या जाहिरनाम्यात बिहारमध्ये कोरोना लस मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. यावर राहुल गांधी यांनी ट्विट द्वारे जोरदार टिका केली आहे. त्या टिकेला मोदी कशा पद्धतीने उत्तर देतील हे पहाणे ही रोचक ठरणार आहे.

२४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेसाठी तीन टप्प्यात निवडणूक होत आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी मतदान होईल, तर मतमोजणी १० नोव्हेंबरला होईल. पहिल्या टप्प्यात २८ नोव्हेंबरला ७१ विधानसभा जागांसाठी मतदान होईल, तर दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबरला ९४ जागांसाठी आणि शेवटच्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला ७८ जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत, राजद काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या साथीने लढत असून भाजप आणि जेडीयूसह इतर चार पक्ष त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details