महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तरप्रदेश, गुजरातसह देशातील १८ राज्यांमध्ये ५१ विधानसभा जागांसाठी आज पोटनिवडणुका - उत्तरप्रदेश निवडणूक

उत्तरप्रदेशमध्ये आज (सोमवार) ११ विधानसभा जागांवर पोटनिवडणुका होत आहेत. याबरोबर देशातील विविध राज्यामध्ये पोटनिवडणुका होत आहेत.

मतदान करताना नागरिक

By

Published : Oct 21, 2019, 9:19 AM IST

Updated : Oct 21, 2019, 1:13 PM IST

लखनऊ - संपूर्ण देशामध्ये १८ राज्यांमध्ये ५१ जागांवर आज( सोमवार) पोटनिवडणूका आहेत. तसेच बिहार आणि महाराष्ट्र राज्यामध्ये २ लोकसभा जागांसाठी निवडणूक आहे. उत्तरप्रदेशमध्ये सर्वाधिक ११ विधानसभा जागांवर पोटनिवडणुका होत आहेत. पोटनिवडणूक असली तर अनेक ठिकाणी उमेदवारांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत.

कोणकोणत्या राज्यात आहेत विधानसभेच्या पोटनिवडणुका?

  • उत्तरप्रदेशमध्ये ११ जागांसाठी मतदान होत आहे.
  • गुजरातमध्ये ६ विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुका होत आहे.
  • बिहार आण केरळमध्ये प्रत्येकी ५ जागांसाठी मतदान होत आहे.
  • आसाम पंजाबमध्ये प्रत्येकी ४ जागांसाठी मतदान होत आहे.
  • हिमाचल, तमिळनाडू आणि राजस्थानध्ये प्रत्येकी २ जागांसाठी मतदान होत आहे.
  • तर अरुणाचप्रदेश, मध्यप्रदेश, ओडिसा, छत्तीसगड, पुद्दुच्चेरी, मेघालया, तेलंगानामध्ये प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होत आहे.
  • सिक्कीम राज्यात ३ जागांवर पोटनिवडणूक आहे.

१८ राज्यातील एकून ५१ विधानसभा जागांवर दुपारी १ वाजेपर्यंत १९. ४३ टक्के मतदान झाले आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये २४ टक्के, आसाममध्ये ३१.१९ टक्के, बिहारमध्ये १६.९४, गुजरात २० टक्के, हिमाचल प्रदेश सरासरी २४.५, केरळ १५.५८, मध्यप्रदेश २४.७६, मेघालय २२.७२, ओडिशा २५.७०, तर पंजाबमध्ये २३.५८ टक्के मतदान झाले.

विधानसभा पोटनिवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातील सातारा आणि बिहारमधील समस्तीपूर येथे लोकसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.

उत्तरप्रदेशातील पोटनिवडणूक आढावा

उत्तरप्रदेशात भारतीय जनता पक्षाने पोटनिवडणुकीसाठी जोरदार केला आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्या पक्षाने पोटनिवडणूक प्रचारामध्ये भाग घेतला नाही. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी फक्त रामपूर येथील जागेसाठी प्रचार केला. तर आझम खान यांनी पत्नी तंजीम खान यांच्यासाठी प्रचार केला. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी प्रचारामध्ये भाग घेतला नाही.

राज्यातील गंगोह, रामपूर, ईगलास (राखीव), लखनऊ छावणी, गोविंदनगर, मानिकपूर, प्रतापगड, झैदपूर (राखीव), जलालपूर, बल्हा (राखीव) आणि घोसी या जागांसाठी मतदान सुरू आहे. ११ जागांसाठी एकून ४० लाख ८ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

११ जागांपैकी ८ जागांवरील उमेदवार मे महिन्यामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने त्या जागा खाली आहेत. सर्व ११ जागांसाठी १०९ उमेदवार रिंगणात आहेत. २ हजार ३०७ मतदान केंद्रांवर एकूण ४ हजार ५२९ बूथ आहेत. यापैकी ४२९ बूथ संवेदनशील असून तेथे वेबकास्टींग केले जाणार आहे. या मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्यांचे बारीक लक्ष असणार आहे.

Last Updated : Oct 21, 2019, 1:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details