महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 30, 2020, 1:03 PM IST

ETV Bharat / bharat

'जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत फक्त सत्य सांगत राहणार'

ऑल इंडिया मजलिस-ए-एत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) पक्षाचे नेते आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी किशनजंगमध्ये एका प्रचार सभेला संबोधीत केले. प्रदेशाचा विकास करण्यासाठी ऑल इंडिया मजलिस-ए-एत्तेहादुल मुस्लीमीन पक्षाच्या उमेदवाराल मत देण्याचे आवाहन त्यांनी केले.

असदुद्दीन ओवेसी
असदुद्दीन ओवेसी

पाटणा - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-एत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) पक्षाचे नेते आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी किशनजंगमध्ये एका प्रचार सभेला संबोधीत केले. यावेळी त्यांन काँग्रेस, आरजेडी आणि एनडीएवर जोरदार टीका केली. तसेच एनपीआर आणि सीएएवर कोरोना महामारीनंतर मोर्चा काढण्याचे आवाहन केले. 'मी चिथावणीखोर भाषण दिले, असे काँग्रेस आणि राजेडी म्हणेल. मात्र, जोपर्यंत मी जिवंत आहे. तोपर्यंत मी फक्त खरं सांगत राहणार, असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

दराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांची प्रचार सभा

भाजप फक्त खोटी आश्वानसे देऊन सत्तेत आली आहे. बिहार विधानसभा 2015 च्या निवडणुकांमध्ये महागठबंधनच्या नावावर आरजेडी, काँग्रेस आणि जेडीयूने अल्पसंख्याक लोकांना धोका दिला. काँग्रेस आणि आरजेडीमुळे नितिश कुमार सत्तेत आहेत. महागठबंधन सरकार सत्तेत आल्यानंतर बिहारला भाजप आणि आरएसएसमुक्त करू, असे खोटे आश्वासन दिले होते, असे ओवेसी म्हणाले. प्रदेशाचा विकास करण्यासाठी ऑल इंडिया मजलिस-ए-एत्तेहादुल मुस्लीमीन पक्षाच्या उमेदवाराल मत देण्याचे आवाहन त्यांनी केले.

दुसऱ्या टप्प्याचे मतदान 3 नोव्हेंबरला -

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील 71 जागेसाठी मतदान पार पडले आहे. दुसऱ्या टप्प्याचे मतदान 3 नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्याचे मतदान 7 नोव्हेंबरला होणार आहे. तर मतमोजणी ही 10 नोव्हेंबरला होणार आहे. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे 123 जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details