'दिल्ली मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यास उशीर का? हा प्रकार धक्कादायक' - arvind kejriwal on EC
निवडणूक आयोग काय करतोय? किती लोकांनी मतदान केले, याची माहिती निवडणूक आयोग का जाहीर करत नाही? निवडणूक होऊन बराच काळ लोटला आहे, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
!['दिल्ली मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यास उशीर का? हा प्रकार धक्कादायक' अरविंद केजरीवाल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6014731-810-6014731-1581249875668.jpg)
अरविंद केजरीवाल
नवी दिल्ली -दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काल (शनिवारी) मतदान पार पडले. मात्र, केंद्रिय निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी अद्यापही जाहीर केली नाही. यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. मतदान होऊन अनेक तास झाल्यानंतरही माहिती जाहीर होत नाही, हे धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरवरून दिली आहे.