महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

निराधारांसाठी आश्रय असलेले 'अपना घर', दर महिन्याला जवळपास १५० लोकांवर मोफत उपचार - निराधारांसाठी आश्रय बातमी

देशात अनेक गरजू, निराधार लोक आहेत ज्यांना घर नाही, खायला अन्न नाही, घालायला कपडे नाही. आरोग्यसुविधेसारख्या गोष्टी तर त्यांच्यापर्यंत कधी पोहोचतच नाहीत. अशा या लोकांना आश्रय देऊन शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न 'अपना घर'च्या माध्यमातून केला जात आहे.

निराधारांसाठी आश्रय असलेले 'अपना घर'
निराधारांसाठी आश्रय असलेले 'अपना घर'

By

Published : Sep 10, 2020, 6:07 AM IST

नवी दिल्ली - देशात असे कितीतरी लोकं आहेत ज्यांना स्वत:चे घर नाही, राहायला जागा नाही, खायला अन्न नाही. दररोज कितीतरी निराधार लोकं उपाशी झोपतात. अशा या लोकांच्या मदतीसाठी सन २००० मध्ये डॉ. बीएम भारद्वाज यांनी 'अपना घर'ची स्थापना केली. आज अपना घर या आश्रमाच्या देशभरात ३५ शाखा तर नेपाळमध्ये एक शाखा कार्यरत आहे.

निराधारांसाठी आश्रय असलेले 'अपना घर'

गरजू, निराधार लोकांना मदतीचा हात द्यावा या उद्देशातून त्यांनी अपना घरची सुरुवात केली. आणि पाहता पाहता संपूर्ण जनसेवेतून चालणारे हे आश्रम आज तब्बल ६ हजार ४०० निराधारांचे घर बनले आहे. या आश्रमाला २० वर्ष झाले असून आत्तापर्यंत निराधार, बेघर आजारी असलेल्या जवळपास २२ हजार लोकांवर उपचार करुन त्यांना स्वस्थ करण्यात आले आहे. या आश्रमातून दररोज ४ ते ५ आणि दर महिन्याला जवळपास दीडशे लोकांवर उपचार करुन स्वस्थ झाल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवले जाते.

डॉ. भारद्वाज आणि आणि माधुरी भारद्वाज यांच्या अपना घरने आज अनेकांना नवसंजीवनी दिली आहे. त्यांनी लावलेले हे अपना घर नावाचे रोपटे आज मोठे झाले असून पाहता पाहता त्याच्या फांद्या देशभरात पसरल्या. आज या आश्रमाच्या देशभरात ३५ तर नेपाळमध्ये एक शाखा कार्यरत आहे. गरजवंतांच्या या 'अपना घर'मध्ये प्रत्येकाला जागा आहे. माणसंच नव्हे तर, जखमी प्राणी, पशु पक्ष्यांवरदेखील येथे उपचार केले जातात.

मदतीसाठी 'देवाला पत्र'

जनकल्याणासाठी सुरू करण्यात आलेले हे आश्रम पूर्णत: जनसेवेतून चालते. या आश्रमाला कधीही मदतीची गरज पडल्यास ते देवाच्या नावाने पत्र लिहून ते अपना घर आश्रमाच्या भिंतीवर चिटकवतात. यानंतर हे पत्र वाचणारे अनेकजण आपापल्या परिने शक्य ती मदत आश्रमाला करतात. या पत्राला आश्रमाकडून 'मदतीसाठी देवाला पत्र' असे नाव देण्यात आले आहे.

देशात अनेक गरजू, निराधार लोक आहेत ज्यांना घर नाही, खायला अन्न नाही, घालायला कपडे नाही. आरोग्यसुविधेसारख्या गोष्टी तर त्यांच्यापर्यंत कधी पोहोचतच नाही. अशा या लोकांना शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न 'अपना घर'च्या माध्यमातून केला जात आहे. त्यांच्या हा प्रयत्न अनेक गरजू आणि निराधार लोकांसाठी आशेचा किरण ठरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details