महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 15, 2019, 11:14 AM IST

ETV Bharat / bharat

BSNL च्या तब्बल 75 हजार कर्मचाऱ्यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती

कंपनीच्या व्हीआरएस योजनेसाठी सध्या जवळजवळ एक लाख कर्मचारी पात्र आहेत. तर, कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या जवळजवळ दीड लाख आहे. सध्या कंपनीने ७७ हजार कर्मचाऱ्यांनी या पर्यायाची निवड करावी, असे लक्ष्य ठेवले आहे.

स्वेच्छानिवृत्ती

नवी दिल्ली -सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) जवळजवळ 75 हजार कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हीआरएस) स्वीकारली आहे. कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक पी. के. पुरवार यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

कंपनीच्या व्हीआरएस योजनेसाठी सध्या जवळजवळ एक लाख कर्मचारी पात्र आहेत. तर, कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या जवळजवळ दीड लाख आहे. सध्या कंपनीने ७७ हजार कर्मचाऱ्यांनी या पर्यायाची निवड करावी, असे लक्ष्य ठेवले आहे. सध्याच्या योजनेनुसार, व्हीआरएस घेण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२० निर्धारित करण्यात आली आहे.

कंपन्यांकडून स्‍वेच्छा निवृत्ती योजना (वीआरएस) कर्मचाऱ्यांची संख्‍या तातडीने मोठी प्रमाणात कमी करायची असल्यास हे तंत्र वापरले जाते. जास्तीचे मनुष्यबळ कमी करण्यासाठी आणि कामगिरी सुधारण्यासाठी याचा वापर केला जातो. या योजनेला 'गोल्‍डन हॅन्डशेक'ही म्हटले जाते.

बीएसएनलची सध्याची व्हीआरएस योजना-2019 मध्ये 70 ते 80 हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास वेतनावर होणार खर्च कमी होऊन सात हजार कोटी रुपये वाचणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details