महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मुसळधार पावसामुळे गोठ्याचा छत कोसळून १७ जनावरे दगावली, तर ५ म्हशी जखमी

छतावर जनावरांसाठींचा चारा ठेवण्यात आला होता. काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे छत कोसळले. यामध्ये चारा आणि पत्र्याखाली दबल्यामुळे १३ म्हशी, २ गायी आणि २ वासरांचा मृत्यू झाला आहे.

By

Published : Jul 18, 2019, 1:50 PM IST

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी दिल्ली - नजफगढ भागात बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे गोठ्यावरील पत्र्याचा छत कोसळला. यामध्ये १३ म्हशी, २ गायी आणि २ वासरांचा मृत्यू झाला आहे. तर, ५ म्हशी गंभीर जखमी झाली आहेत.

नजफगढ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बठींडातील भागत भाई का परिसरामध्ये जनावरांच्या सुरक्षेसाठी पत्र्याचे छत बांधण्यात आले होते. याखाली जनावरे बांधण्यात आली होती. छतावर जनावरांसाठींचा चारा ठेवण्यात आला होता. बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे छत कोसळले. यामध्ये चारा आणि पत्र्याखाली दबल्यामुळे १३ म्हशी, २ गायी आणि २ वासरांचा मृत्यू झाला आहे. तर, ५ म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत. यावेळी छताखाली ७५ जनावरांना बांधण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details