जयपूर : राजस्थानमध्ये केमिकलची बाधा झाल्यामुळे १६ मनरेगा कामगारांना रुग्णालयात भरती करण्यात आले. टोळधाडीसाठी फवारणी करण्यात आलेले कीटकनाशक श्वासावाटे आत गेल्यामुळे हे सर्व आजारी पडल्याचे समजत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या जयसिंगपुरामध्ये असलेल्या एका शेतात टोळधाडीसाठी कृषी विभागाने कीटकनाशक फवारले होते. सोमवारी रात्री याची फवारणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी सकाळच्या सुमारास या शेताच्या शेजारी असलेल्या साईटवर मनरेगाचे काही कामगार पोहोचले. त्यावेळी फवारणी होऊन गेली होती, मात्र वाऱ्याची दिशा त्यांच्या बाजूने असल्यामुळे, श्वासावाटे हे कीटकनाशक त्यांच्या शरीरात गेले आणि ते आजारी पडले.