महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sawan 2023 : म्हणूनच देवाला बेलपत्र आणि जलाभिषेक आवडतात, श्रावणमध्ये आहे विशेष महत्त्व - श्रावण महिना सुरू

श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते. यासाठी गंगाजल आणि बेलपत्राचे विशेष महत्त्व सांगितले जाते. महादेवाला बेलपत्रे एवढी प्रिय का आहे माहीत आहे का?

BELPATRA AND JALABHISHEK IMPORTANCE IN SAWAN
देवाला बेलपत्र आणि जलाभिषेक

By

Published : Jul 7, 2023, 11:11 AM IST

Updated : Jul 10, 2023, 9:54 AM IST

हैदराबाद : श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. यंदा उत्तरेकडच्या राज्यांमध्ये श्रावण महिना 4 जुलैपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. महाराष्ट्रात श्रावण अधिक मास १८ जुलैपासून सुरु होईल. श्रावण महिना सुरू होताच शिवालय आणि धार्मिक श्रद्धा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. श्रावण महिन्यात भोले शंकराच्या पूजेसाठी सर्वात उपयुक्त बाबींमध्ये बेलपत्राची गणना केली जाते. पूजेमध्ये बेलपत्राचे विशेष महत्त्व असून त्याशिवाय शिवपूजा अपूर्ण मानली जाते.

श्रावणमध्ये शिवाची पूजा

  • बेलपत्राची गरज का आहे?भोलेनाथ साक्षात बेलाच्या झाडावर राहतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. भोलेनाथाला बेल झाडाची फळे, फुले आणि पाने खूप प्रिय आहेत. हे बेलपत्र अर्पण करण्याच्या परंपरेबद्दल काही आख्यायिका आहेत. त्यामुळे शिवपूजेत त्याचे महत्त्व वाढले आहे.
  • समुद्रमंथन आणि बेलपत्र :श्रावण महिन्यातच समुद्रमंथन झाल्याचे सांगितले जाते. समुद्रमंथनानंतर जे विष बाहेर पडले, ते विष देवाधिदेव महादेवाने संपूर्ण विश्वाला वाचवण्याच्या उद्देशाने आपल्या घशात घेतले. हलाहल विषाच्या परिणामामुळे शिवाचा घसा निळा झाल्याचे सांगण्यात येते. याच्या प्रभावाने भोलेनाथचे संपूर्ण शरीर तापू लागले. यावर उपाय म्हणून बेलपत्राचा वापर केला गेला ज्यायोगे विषाचा प्रभाव कमी झाला, अशी एक आख्यायिका आहे.
  • बेलपत्राचे महत्त्व : हे कळताच घटनास्थळी उपस्थित सर्व देवी-देवतांनी भोलेनाथाला बेलपत्र अर्पण करण्यास सुरुवात केली. भगवान नीलकंठाने बेलपत्र ग्रहण केल्याचा परिणाम दिसू लागला आणि त्यांच्या शरीरातून विषाचा प्रभाव कमी होऊ लागला. भोलेनाथाला शीतलता लाभावी म्हणून बेलपत्राव्यतिरिक्त जलाभिषेक सुरू करण्यात आला. त्यामुळे बेलपत्र आणि जलाभिषेकची परंपरा सुरू झाली.

बेलपत्राचे काही नियम आहेत :

1. बेलपत्राच्या तीन पानांचा गुच्छ भगवान शंकराला अर्पण केला जातो असे मानले जाते. असे मानले जाते की त्याच्या गाभ्यामध्ये सर्व पवित्र स्थाने राहतात.

2. सोमवारी महादेवाला बेलपत्र अर्पण करायचे असेल तर ते रविवारीच उपटावे कारण सोमवारी बेलपत्र तोडले जात नाही. याशिवाय चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्येला संक्रांतीच्या वेळीही बेलपत्र तोडण्यास मनाई आहे.

3. बेलपत्र कधीही अपवित्र नसते. आधीच अर्पण केलेले बेलपत्र पुन्हा धुतल्यानंतरदेखील देऊ शकता.

4. बेलपत्राची खंडित पाने कधीही अर्पण करू नयेत.

5. बेलपत्र नेहमी भगवान शंकराला उलटे अर्पण केले जाते. म्हणजेच गुळगुळीत पृष्ठभागाच्या दिशेने असलेल्या भागाला शिवालिंगाला स्पर्श करताना बेलपत्र अर्पण करावे. अनामिका, अंगठा आणि मधले बोट यांच्या मदतीने नेहमी बेलपत्र अर्पण करावे. भगवान शंकराला जलाभिषेक करावा.

हेही वाचा :

  1. Sawan Shivratri 2023 : श्रावण शिवरात्रीला राशीनुसार भगवान शिवाची उपासना करा, तुम्हाला अपेक्षित फळ मिळेल
  2. Sawan Somwar 2023 : श्रावण सोमवारी धतुर्‍याने करा हे सोपे उपाय, सर्व दु:ख आणि त्रास दूर होतील
  3. Bell Leaf For Health : महादेवाचे आवडते बेलपान मधुमेह आणि पोटाचे विकार करते बरे; जाणून घ्या सविस्तर
Last Updated : Jul 10, 2023, 9:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details