महाराष्ट्र

maharashtra

Agnipath scheme protest: अनेक राज्यांमध्ये गोंधळ, रेल्वे गाड्यांची जाळपोळ, पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू

By

Published : Jun 17, 2022, 12:46 PM IST

Updated : Jun 17, 2022, 3:28 PM IST

लष्कर भरतीसाठी केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये तिसऱ्या दिवशीही हिंसक निदर्शने सुरूच आहेत. बिहार, यूपी, तेलंगणा येथे ट्रेन जाळण्याच्या घटना घडल्या. तेलंगणातील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर आंदोलकांची पोलिसांशी चकमक. येथे पोलिसांच्या गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. तर आठ जणांना गोळ्या लागल्या आहेत. (Agnipath scheme protest).

अनेक राज्यांमध्ये गोंधळ, रेल्वे गाड्यांची जाळपोळ
अनेक राज्यांमध्ये गोंधळ, रेल्वे गाड्यांची जाळपोळ

नवी दिल्ली/हैदराबाद/लखनऊ : केंद्र सरकारने सशस्त्र दलात भरतीसाठी जाहीर केलेल्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये तिसऱ्या दिवशीही निदर्शने सुरू आहेत. गाड्या जाळण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले. देशभरात अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर निदर्शने झाली. त्यामुळे गाड्यांवर परिणाम झाला. बिहारमध्ये निदर्शनादरम्यान ट्रेनच्या 10 बोगी पेटवण्यात आल्या. तेलंगणातही तोडफोडीनंतर ट्रेन पेटवण्यात आली. येथे पोलिसांच्या गोळ्या लागल्याने एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. आठ आंदोलकांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत.

अनेक राज्यांमध्ये गोंधळ, रेल्वे गाड्यांची जाळपोळ

बिहारमध्ये ट्रेनच्या 10 बोगी जाळल्या : बिहारमध्ये 19 जिल्ह्यांमध्ये निदर्शने झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. येथे अनेक ठिकाणी निदर्शनांना हिंसक वळण लागले आहे. लखीसरायमध्ये ट्रेनच्या 10 बोगींना आग लावण्यात आली. हाजीपूर स्थानकाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. बेतिया येथेही तोडफोड झाली. बक्सरमध्ये विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅकवर निदर्शने केली. येथे डुमराव रेल्वे स्थानकाच्या अप आणि डाऊन मार्गावर जाम झाला होता. दिल्ली-कोलकाता रेल्वे मुख्य रस्ता ठप्प झाल्याने अनेक गाड्या तासन्तास अडकून पडल्या होत्या. सैन्य भरतीच्या नव्या नियमाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी पहाटे पाच वाजल्यापासून रेल्वे रुळावर बसून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. शुक्रवारी सकाळी समस्तीपूरमध्ये आंदोलकांनी जम्मू तवी-गुवाहाटी एक्सप्रेस ट्रेन पेटवून दिली. ट्रेनच्या दोन बोगी जळून राख झाली. आराच्या बिहिया स्टेशनवर जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे.

अनेक राज्यांमध्ये गोंधळ, रेल्वे गाड्यांची जाळपोळ


यूपीच्या बलियामध्ये ट्रेन पेटवली: अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ तरुणांनी बलिया रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनची तोडफोड करून ती पेटवून दिली. आंदोलकांनी शहरातील अनेक दुकानांचे काउंटरही फोडले. गोंधळ घालणाऱ्या लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. फिरोजाबादमधील मतसेना भागात काही तरुणांनी आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर गोंधळ घातला. यूपी रोडवेजच्या अनेक बसेसवर दगडफेक करून नुकसान केले.

अनेक राज्यांमध्ये गोंधळ, रेल्वे गाड्यांची जाळपोळ

तेलंगणात ट्रेनला आग -तेलंगणात आंदोलकाचा मृत्यू : तेलंगणातही निदर्शने झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आंदोलकांनी येथील सिकंदराबाद रेल्वे स्थानकाची तोडफोड केली. सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर जमलेल्या तरुणांनी एनडीए सरकारच्या विरोधात निदर्शने केली. जुन्या धर्तीवर भरती करण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलकांनी हैदराबाद ते कोलकाता जाणाऱ्या ईस्ट कोस्ट ट्रेनला आग लावली. हिंसक आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापरही केला. येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. आठ जणांना गोळ्या लागल्या आहेत. निर्मल असे मृताचे नाव सांगितले जात आहे.

हल्दवानीमध्ये निदर्शने -उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने झाली आहेत. हल्दवानीमध्ये शुक्रवारी सकाळी रामलीला मैदानावर मोठ्या संख्येने तरुण जमले आणि त्यांनी मिरवणूक काढण्याची तयारी सुरू केली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरुणांवर लाठीमार करून त्यांना पळवून लावले. या वेळी एका आंदोलकाने भरती प्रक्रियेमुळे आत्मदहन करावे लागले तरी मागे हटणार नसल्याचे सांगितले. लाठीचार्जही यावेळी करण्यात आला.

झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅक जाम -झारखंडमध्येही निदर्शनाच्या घटना समोर आल्या आहेत. पलामूमध्ये तरुणांनी डाल्टनगंज रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या अप आणि डाऊन लाईन रोखून घोषणाबाजी केली. यापूर्वी तरुणांनी राष्ट्रीय महामार्ग 75 रोखून धरला होता. राष्ट्रीय महामार्गावरून निघाल्यानंतर तरुण रेल्वे रुळावर बसले. पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलकांना ट्रॅकवरून हटवले.

ओडिशात अग्निपथ योजनेचा निषेध -सशस्त्र दलात भरतीसाठीच्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात कटकसह ओडिशात इतरही अनेक ठिकाणी आंदोलने उफाळून आली आहेत. भारतीय सैन्यात करिअर करण्यासाठी इच्छुक असलेले शेकडो तरुण आर्मी रिक्रुटिंग ऑफिसजवळ आंदोलन करत आहेत. आंदोलक इच्छुकांनी दावा केला की त्यांनी गेल्यावर्षी सैन्यात भरतीसाठी त्यांच्या वैद्यकीय आणि शारीरिक चाचण्या पास केल्या आहेत. लेखी परीक्षा, सामायिक प्रवेश परीक्षा (CEE) ची वाट पाहत होते, जी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे.

पश्चिम बंगालमध्येही अग्निपथ विरोधात आंदोलन - भारतीय सैन्य भरतीसाठी केंद्राच्या नवीन 'अग्निपथ योजने' विरोधात संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये शुक्रवारी निदर्शने सुरू झाली आहेत. राज्याच्या उत्तरेकडील सिलीगुडीपासून दक्षिणेकडील हावडापर्यंत विविध भागात तुरळक अशांतता आहे. ठाकूरनगरमध्ये सियालदह-बनगाव विभागात पहाटे रेल रोको करण्यात आला. केंद्राच्या या निर्णयाच्या निषेधार्थ युवक रस्त्यावर उतरले आहेत. दीड तासाच्या रेल रोकोनंतर प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी मेगाब्लॉक मागे घेतला.

काय आहे योजना -या योजनेअंतर्गत चार वर्षांसाठी आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्समध्ये नवीन भरती होणार आहे. चार वर्षांनंतर ७५ टक्के सैनिक पेन्शनसारख्या सुविधांशिवाय निवृत्त होतील. उर्वरित 25 टक्के भारतीय लष्करात नियमित ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ, सरकारने या प्रक्रियेअंतर्गत भरतीचे वय 2022 साठी आधी घोषित केलेल्या 21 वर्षांवरून 23 वर्षे केले आहे.

Last Updated : Jun 17, 2022, 3:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details