महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Anushka Emotional Post for Virat : विराटला मिस करत आहे अनुष्का, इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत दिले 'असे' कॅप्शन - Anushka Sharma emotional Post for Virat

भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 ( India vs Australia T20 Series ) मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी मोहालीला पोहोचला आहे. विराटही टीमसोबत आहे, पण त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Actress Anushka Sharma ) त्याला खूप मिस करत आहे.

Virushka
विरुष्का

By

Published : Sep 18, 2022, 12:04 PM IST

मोहाली: भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली ( Former captain Virat Kohli ) सध्या मोहालीत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ( India vs Australia T20 Series ) तो पंजाबमध्ये पोहोचला आहे. दरम्यान, त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर त्याच्यासाठी एक पोस्ट शेअर केली ( Anushka emotional post for Virat ) आहे. अनुष्का पती विराटला खूप मिस करत असल्याचे या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे. या पोस्टवर विराटने देखील रिप्लाय दिला आहे.

अनुष्काची विराटसाठी भावनिक पोस्ट ( Anushka emotional post for Virat Kohli ) -

अभिनेत्री अनुष्का शर्माने ( Actress Anushka Sharma ) विराटसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जेव्हा तुम्ही या ठिकाणी किंवा हॉटेलच्या बायो-बबलमध्ये या व्यक्तीसोबत असता, तेव्हा जग अधिक रोमांचक, मजेदार आणि सुंदर दिसते.' त्यासोबत तिने हॅशटॅगमध्ये लिहिले – मिसिंग हबी पोस्ट. याशिवाय हार्ट इमोजीही शेअर केला आहे.

विराटच्या रिप्लाय हजारो लाईक्सचा पाऊस -

विराट कोहलीनेही अनुष्काच्या पोस्टला उत्तर दिले ( Virat replied to Anushka post ) आहे. त्याने फक्त दोन हृदय इमोजी शेअर केले आणि मध्यभागी अनंत चिन्ह बनवले. विराटच्या या रिप्लायला 14 हजारांहून अधिक युजर्सनी लाईक केले आहे. इतकेच नाही तर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पोस्टला जवळपास 20 लाख लाईक्स मिळाले आहेत.

25 सप्टेंबरपर्यंत चालणार भारत-ऑस्ट्रेलिया मालिका ( India vs Australia T20 Series ) -

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-20 सामना 20 सप्टेंबर रोजी मोहाली येथे खेळवला जाणार आहे. यानंतर दोन्ही संघ नागपूरला रवाना होतील जिथे दुसरा टी-20 सामना 23 सप्टेंबरला होणार आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना 25 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये खेळवला जाईल. यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्यानंतर 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे.

हेही वाचा -HBD Ravichandran Ashwin : दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचा आज 36 वा वाढदिवस, बीसीसीआयने दिल्या अनोख्या शैलीत शभेच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details