गांधीनगर : गुजरातच्या भरुचमध्ये असलेल्या कंबोडिया गावात गोठ्याला लागलेल्या आगीत १८ जनावरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रविवारी दुपारी ही दुःखद घटना घडली. मृतांमध्ये ९ गायी, ८ वासरे आणि एका घोडीचा समावेश आहे.
अचानक लागली आग..
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कंबोडिया गावात राहणाऱ्या राम रापोलिया यांनी दोन वर्षांपूर्वी हा गोठा उभारला होता. ते आपल्या कुटुंबीयांप्रमाणे या जनावरांची देखभाल करत. जनावरांना उन्हाळ्यात त्रास होऊ नये यासाठी त्यांनी बांबू आणि ग्रीन नेटचा वापर करत हा गोठा बांधला होता. या गोठ्यात एकूण २८ जनावरे होती. रविवारी दुपारी राम आपल्या घरी जेवण करत असतानाच त्यांना गोठ्यात आग लागल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने याठिकाणी धाव घेतली, मात्र तोपर्यंत संपूर्ण गोठ्याने पेट घेतला होता.
१८ जनावरे दगावली; लाखोंचे नुकसान..