कुशीनगर (उत्तर प्रदेश) - कुशीनगरमधील कसया पोलीस स्टेशन हद्दीतील सिसाई गावातील लातूर टोला येथे टॉफी (चॉकलेट) खाल्ल्याने 4 मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर ( Kushinagar 4 children died after eating toffee ) आली आहे. दरम्यान, एकाचवेळी 4 मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृत मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवले असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Children Died Eating Chocolate : चक्क चॉकलेट खाल्ल्याने ४ मुलांचा मृत्यू - यूपी लेटेस्ट न्यूज मराठी
कुशीनगरमधील कसया पोलीस स्टेशन हद्दीतील सिसाई गावातील लठूर टोला येथे टॉफी खाल्ल्याने ४ मुलांचा मृत्यू झाल्याची ( Kushinagar 4 children died after eating toffee ) घटना समोर आली आहे. त्याचवेळी 4 मुलांचा एकत्रित मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे.

चॉकलेट खाल्ल्याने यूपीत चार मुलांचा मृत्यू
दारात फेकले होते चॉकलेट - एका घरातील तीन मुलांचा आणि तर शेजारील दुसऱ्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, त्याच्या दारात टॉफी फेकण्यात आली होती. ती मुलांनी खाल्ली. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे.
हेही वाचा - Girish Mahajan Complaint : गिरीश महाजन यांचे तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात तक्रार
Last Updated : Mar 23, 2022, 1:33 PM IST